अविनाश कवठेकर

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेबाबतची नाराजी आणि माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पक्षाविरोधात  भूमिका घेतल्याने पुण्यातही शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.

Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
women given special discounts by builders in thane
ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
Chief Minister s Relief Fund marathi news
आता प्रत्येक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’
Preparations In Full Swing For 58th Nirankari Sant Samagam
पिंपरीत आजपासून निरंकारी संत समागम; देश, विदेशातील भक्त दाखल
Deputy Chief Minister Eknath Shinde directed to build Ayushman Shatabdi Tower in KEM for patients Mumbai print news
रुग्णांसाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरातील एका गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असून या गटाला थोपविण्याचे प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाकडून सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून भावनिक आवाहन केले जात आहे. मात्र आगामी महापालिका निवडणूक आणि राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावरच असल्याचे स्पष्ट दिसत आहे.शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुरुवातीला पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील या बंडाला थंड प्रतिसाद मिळाला. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक पुणे, पिंपरी व जिल्ह्यात नाहीत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाला राज्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसू लागल्यानंतर शहर शिवसेनेच्या पातळीवरही उलाथापालथ सुरू झाली.
महापालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक आहेत. शहर आणि जिल्ह्यात शिवसेना कमकुवत आहे. त्यामुळे या बंडामुळे शिवसेनेला काही फरक पडणार नाही, अशी शक्यता होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ काही नगरसेवकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मात्र हा प्रकारही केवळ दिखाऊ ठरला. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाल्यानंतर त्याचे पडसाद शहरातही दिसून येण्यास सुरुवात झाली.

शिंदे- फडणवीस सरकारला घटनाबाह्य ठरविण्यासाठी शिवसेनेकडून अरूणाचल प्रकरणाचा दाखला 

महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च २२ रोजी संपुष्टात आली. महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांच्या हाती आला. नगरसेवकांचे वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर प्रभागातील कामांना निधी मिळत नव्हता. हीच बाब शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हेरली आणि थेट एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब पत्राद्वारे आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीने आयुक्तांशी संपर्क साधत निधी देण्याचे आदेश दिले आणि शहरातील प्रभागांसाठी १६२ कोटींचा निधी देण्याचा निर्णय, आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी तातडीने वित्तीय समितीच्या बैठकीत घेतला आणि एकनाथ शिंदे समर्थकांना बळ मिळाले. त्याचे पडसाद शहर शिवसेनेतही दिसून आले. त्यामुळे आता शिवसेनाही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.

आगामी महापालिका निवडणूक आणि सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटालावर शिवसेनेला टोकदार सामना करावा लागणाऱ आहे. जिल्हा संपर्क प्रमुख आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी शिवसेना फुटणार नाही, असे सांगत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची ही शिवसेना आहे, असे भावनिक आवाहन करत आहेत. बंडखोरांना चुचकारण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत. सध्या एका नगरसेवकाने बंडखोरी केली असली तरी बंडखोरीचे लोण पक्षात खालपर्यंत पोहोचले आहे, हे वास्तव आहे. अनेक आजी-माजी नगरसेवकांनी बंडाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बंडखोरांना रोखण्यासाठी शहर शिवसेना सरसावली असली तरी बंडखोरांकडून त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी करण्याची तयारीही नगरसवेकांकडून सुरू झाली आहे. अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधत असल्याची कबुलीही शहर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून खासगीत दिली जात आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर शिवसेनेला पुनर्बांधणीची आवश्यकता नाही. शहर शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे. आगामी निवडणुकीसाठी रणनीती तयार आहे, असा दावा जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी केला. मात्र शहरापेक्षा जिल्ह्यातील बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसेल, असे त्यांनी सांगितले. शहर शिवसेनेत बंडखोरी होणार नाही. काही जणांनी तयारी केली आहे. मात्र त्यांना थोपवले जाईल. मुळातच ते मूळचे शिवसैनिक नाहीत. तरीही शिवसेनाला शहरात काही फरक पडणार नाही, असा दावा शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी केला. मात्र शिवसैनिकांधील अस्वस्थता आणि बदललेली राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader