भाजपाला रोखण्यासाठी पाटणा येथे दि. २३ जून रोजी विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत आम आदमी पक्षाचाही सहभाग होता. मात्र केंद्र सरकराने दिल्ली प्रशासनाबाबत काढलेल्या वटहुकूमावर या बैठकीत चर्चा झाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आम आदमी पक्षाने आता विरोधकांपासून अंतर ठेवण्याची भूमिका घेतली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून रोजी समान नागरी (UCC) कायद्याबाबत भाष्य केले, त्यावरून भाजपाचा पुढचा कार्यक्रम समान नागरी कायदा लागू करणे असेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. विरोधी पक्षानी समान नागरी कायद्याचा विरोध केला आहे, मात्र ‘आप’ने समान नागरी कायद्याला तत्त्वतः पाठिंबा देऊ केला. ‘आप’ने याआधीही यूसीसीला पाठिंबा दिला असल्याचे म्हटले आहे. मात्र यावेळी पाठिंबा देण्याचे ‘आप’चे टायमिंग हे विरोधकांना बुचकळयात पाडणारे नक्कीच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा