छत्रपती संभाजीनगर : घराच्या समोर प्लास्टीकच्या दोन – तीन टाक्या मांडून ठेवलेल्या. ठराविक अंतराने फिरणारे टँकर दिसतात जालना लोकसभा मतदारसंघात. भोकरदन परिसरातील राजूर परिसरातील दहा किलोमीटरच्या परिघातील साऱ्या विहिरी कोरड्या पडलेल्या. शुष्क प्रदेशात पारा ४० अंशापेक्षा जास्त असताना निवडणूक प्रचाराचा तसा मागमूसही सापडत नाही. काही गावांमध्ये विजेच्या खांबांना बांधलेले भगवे आणि निळे झेंडे एवढेच काही ते निवडणुकीचे रंग. निवडणुकीवर कोणी बोलत नाही. कोणी नेता गावात आलाच तर तेवढ्या पुरते लोक गोळा होतात. मग पुन्हा लोक वाट पाहत राहतात टँकरची. जालना गावातील आम्रपाली बोर्डे म्हणाल्या, ‘दिवसभरातील तीन- चार तास जातात पाणी आणण्यात.’ निवडणुकीपेक्षाही पाणी टंचाईशी दोन हात करणे हा प्राधान्यक्रम आहे. या मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे विरुद्ध कॉग्रेसचे कल्याण काळे यांच्यामध्ये लढत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा