कोल्हापूर : अदानी उद्योग समूहाच्या जलविद्युत प्रकल्पावरून गेली दोन महिने घोंगावणारे वादळ आता शांत झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून पाणी खाली कोकणातील नेऊन २१०० मेगावॉट वीज निर्मिती करण्याच्या या प्रकल्पाच्या विरोधात भुदरगड तालुक्यात विरोधाची ललकारी उलटल्याने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने पाटगाव धरणातून पाणी उचलणार नाही अशी हमी पत्राद्वारे दिली दिल्याने पाणी पळवले जाण्याच्या भीतीने तोंडचे पाणी पळालेल्या शेतकऱ्यांना जलदिलासा मिळाला आहे. हा लढ्याचा, राजकीय पाठपुराव्याचे यश असल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकल्प वेगळ्या पद्धतीने या भागात राबवला जाण्याची शक्यता असल्याने याबाबत श्रेयात मग्न असणारी नेतेमंडळी कितपत जागृत राहणार हा प्रश्नच आहे. तूर्त तरी एका मोठ्या उद्योग समूहाला नमवल्याची भावना लोकप्रतिनिधी आणि या प्रकल्पाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेल्या आंदोलकांमध्ये दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा