महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर वरचष्मा असणाऱ्या नेत्यांनाच सर्वपक्षीयांनी उमेदवारीमध्ये वरचे स्थान दिले आहे. प्रचार मुद्द्यांपेक्षा जात आणि आरक्षण आणि अभुतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत ‘साखरमाया’ घेऊन उतरणारे २४ नेते आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहीत पवार यांच्यासह कॉग्रेसचे नेते अमित देशमुख, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, तानाजी सावंत, राजेश टाेपे, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह २४ साखर कारखांनदारांसह अनेकांनी त्यांच्या मुलांनाही मैदानात उतरले आहेत. सहकारी साखर कारखाने खासगी करताना आणि त्यांच्या विक्रीतील घोटाळ्यांमुळे गेल्या दशकभराच्या राजकारणावर ‘साखर गोडी’तून पकड मिळावी म्हणून सत्ताधारी भाजपने बरेच प्रयत्न केले. उमेदवारीच्या पहिल्या यादीमध्ये ‘साखर सम्राटां’ चा जोर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा