नवी मुंबई : भाजपच्या ‘एक कुटुंब-एक तिकीट’ या नव्या राजकीय सुत्रामुळे नवी मुंबईतील राजकारणावर एकहाती पकड राखणारे माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांचे राजकीय आराखडे पुन्हा एकदा चुकतील का याविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नव्या राजकीय समिकरणात ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या पदरात पडेल आणि तेथून आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर गेल्या काही महिन्यांपासून नाईक यांचे थोरले पुत्र संजीव संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. ऐरोली विधानसभेचे आमदार असलेले मोठया नाईकांचा शहरातील बेलापूर विधानसभा मतदारसंघावरही प्रभाव आहे. त्यामुळे ऐरोलीप्रमाणे बेलापूर मतदारसंघावरही नाईकांचे बारीक लक्ष आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या नव्या सुत्रामुळे नाईक कुटुंबियांना नवी मुंबईवरील एकहाती अंमल भविष्यात राखणे शक्य होईल का याविषयी येथील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा