रत्नागिरी : आचारसंहिता जाहीर होऊन सुमारे आठवडा झाला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली असून त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी आणि बैठका घ्यायला सुरुवातही केली आहे. महायुतीकडून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने सुमारे महिनाभरापूर्वीच इच्छा व्यक्त केली आहे . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं तरच निवडणूक लढवण्यास तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते याबाबत शेवटपर्यंत आग्रही राहिले तर शिंदे गटाला उमेदवारी मिळूनही विद्यमान खासदार राऊत यांना तोंड देऊ शकेल, अशा क्षमतेचा अन्य उमेदवार त्यांना मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा