प्रमोद खडसे

वाशीम : खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात २०२१ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान वाद उफाळून आला होता. यानंतर ते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. परंतु १२ फेब्रुवारी रोजी पोहरादेवीच्या सभेत दोघेही एकमेकांच्या शेजारी बसून चर्चा करीत असतानाची चित्रफीत सार्वत्रिक झाली आणि दोघांमध्ये दिलजमाई झाल्याच्या चर्चेला उधाण आले. राज्यात सत्तांतर होताच दोघांतील वैर संपले का, आगामी निवडणुकांमध्ये ते एकत्र असतील का, त्यांच्या कार्यकर्त्यांचे आपसांत पटेल का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!
chipuln flood
चिपळूणच्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
A protest over a local court-ordered survey of the Sambhal mosque had led to the death of five people there in November. (Source: File)
VHP : संभल वादावर विहिंपचंं सूचक मौन, काशी आणि मथुरेवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत चर्चा, दोन दिवसीय बैठकीत काय ठरलं?

खा. गवळी आणि आ. पाटणी वाशीम जिल्ह्यातील वजनदार नेतृत्व म्हणून सर्वश्रुत आहेत. आ. पाटणी हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत तर खा. गवळी या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. एकेकाळी खा. गवळी आणि आ. पाटणी शिवसेनेत एकत्र होते.. मात्र, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि ते एकमेकांचे विरोधक झालेत. त्यानंतर वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन येथे २६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान विकास कामातील अडथळ्यांवरून खा. गवळी आणि आ. पाटणी एकमेकांविरोधात उभे ठाकले. दोघांत शिविगाळही झाली होती. त्यानंतर आ. पाटणी यांनी वाशीम पोलीस ठाण्यात खा. गवळी यांनी धमकावल्याची तक्रार दाखल केली होती. दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेदेखील समोरा-समोर आले होते. तेव्हापासून दोघांमधील वाद कायम होता.

हेही वाचा… प्रफुल्ल पटेल-फडणवीसांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळल्याने तर्कवितर्क

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करीत ४० आमदार सोबत घेऊन भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. खा. गवळी त्यांच्या समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल झाल्या. त्यानंतर भव्यदिव्य कार्यक्रम घेऊन खा. गवळी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. मात्र, जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीला.

हेही वाचा… पंकजा मुंडे यांची नेमकी भूमिका कोणती ?

१२ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभेच्या व्यासपीठावर आ. पाटणी व खा. गवळी या दोघांच्याही खुर्च्या जवळजवळ होत्या. यावेळी दोघांत चर्चाही रंगली होती. हे पाहता एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोघेही एकत्र आल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Story img Loader