बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातनिहाय सर्वेक्षण केल्यानंतर राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवून, ती ६५ टक्क्यांवर नेण्यात आली. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी असलेली ५० टक्क्यांची मर्यादा ६५ टक्के करण्यासाठी विधेयकही मंजूर करण्यात आले. जातनिहाय सर्वेक्षणातून नितीश कुमार यांनी राजकीय गणिते आखली असली तरी याच सर्वेक्षणामुळे त्यांच्यासमोर आव्हानेही निर्माण झाली आहेत. २ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये राज्यातील किती लोकांकडे सरकारी नोकरी आहे, याची तपशीलवार माहिती उघड झाली आहे. बिहारमधील १३.०७ कोटी जनतेपैकी फक्त १.५ टक्के लोकांकडे (जवळपास २०.४९ लाख) सरकारी नोकरी आहे. एकूण लोकसंख्येपैकी सरकारी नोकरी असण्याचे प्रमाण नगण्य असल्यामुळे आता नितीश कुमार यांच्यासमोर सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा