पीटीआय, श्रीनगर
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. गेल्या सात लोकसभा-विधानसभा निवडणुकांतील हे सर्वाधिक मतदान असल्याची निवडणूक आयोगाने माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५८.१९ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील २४ विधानसभा मतदारसंघांपैकी इंदरवालमध्ये सर्वाधिक ८०.०६ टक्के मतदान झाले. त्याच वेळी, पाडेर-नागसेनीमध्ये ७६.८० टक्के, किश्तवारमध्ये ७५.०४ टक्के आणि दोडा पश्चिममध्ये ७४.१४ टक्के मतदान झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममध्ये काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक ६७.८६ टक्के मतदान झाले.

हेही वाचा : BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
BJP MLA Munirathna Naidu
BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

त्याच वेळी, डीएच पोरामध्ये ६५.२१ टक्के, कुलगाममध्ये ५९.५८ टक्के, कोकरनाग (राखीव) मध्ये ५८ टक्के आणि दुरूमध्ये ५७.९० टक्के मतदान झाले. त्रालमध्ये सर्वात कमी ४०.५८ टक्के मतदान झाल्य़ाचे निवडणूक आयोगाने सांगितले. ते म्हणाले की, पुलवामा जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या पुढे गेली नाही. २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० च्या तरतुदी रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.