उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरु आहे. यादरम्यान, एका महिलेने स्वत:च्या घराला आग लावून घेतली. यात महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. देश संविधानाने नाहीतर बुलडोझरने चालण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे, असं औवेसी यांनी म्हटलं. याला आता केंद्रीय मंत्रि गिरिराज सिंह यांनी औवेसींना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसी बोलतात तेव्हा तोंडातून विषच बाहेर पडत, अशी घणाघाती टीका गिरिराज सिंह यांनी केली आहे.

गिरिराज सिंह म्हणाले, “ओवैसी बोलतात तेव्हा तोंडातून विषच बाहेर पडत असतं. ओवैसी कधीही कायद्याला धरून बोलत नाही. जिन्ना तर गेले आहेत, पण त्यांच्या वारसदाराच्या रुपाने काही लोकं अद्यापही राहिली आहेत. आजपर्यंत देशात हिंदूकडून एकाही तजियावर दगडफेक करण्यात आली नाही.”

bjp pradipsinh Jadeja marathi news
गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी, अजित पवार यांच्या बालेकिल्याकडे भाजपची नजर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
Political message on Govinda t shirt Mumbai news
गोविंदाच्या टी-शर्टवर राजकीय संदेश अन् नेत्यांची छबी; आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींचा टी-शर्टआडून प्रचार
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती
sanjay raut on bjp marathi news
“देशाची आणि राज्याची सूत्रे नागपूरमधून चालतात, मात्र…”, खासदार संजय राऊत यांचा टोला
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर

हेही वाचा : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; TIPRA Motha पक्षामुळे भाजपासमोर कडवे आव्हान

असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले होते?

कानपूरच्या घटनेवर बोलताना असदुद्दीने ओवैसी यांनी म्हटल की, “उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझरचं राजकारण करणाऱ्यांनी एका आई आणि मुलाचा जीव घेतला. पण, हा देश संविधानाने नाहीतर बुलडोझरने चालतो. भाजपा फक्त तोडफोड करायची आहे, जोडायचं नाही,” असं टीकास्र ओवैसी यांनी केलं.

हेही वाचा : “मी टीपू सुलतानचं नाव घेणार, काय करता ते बघतोच”; भाजपा नेत्याच्या ‘त्या’ विधानानंतर असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काय आहे प्रकरण?

सोमवारी कानपूर येथेली मडौली गावात अतिक्रमणाची कारवाई सुरु होती. तेव्हा एका महिलेने आपल्या घराला आग लावली. यामध्ये दोघींचाही होरपळून मृत्यू झाला आहे. यानंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर अधिकारी ज्ञानेश्वर प्रसाद याचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस या अधिकाऱ्याची चौकशी करत आहे.