पालघर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने पालघर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर २९ हजारांचे मताधिक्य घेतले. यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघ महायुतीसाठी सुरक्षित मानला जात आहे. या दृष्टिकोनातून पालघर साठी भाजपाकडून राजेंद्र गावित यांच्यासाठी मागणी केली जाऊ लागल्याने विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

१९९० च्या दशकापासून पालघरच्या विधानसभा जागेवर शिवसेनेचे अधिकतर वेळा प्राबल्य राहिले आहे. २००९ मध्ये काँग्रेस तर्फे निवडून आलेले राजेंद्र गावित हे देखील २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीत सहभागी झाल्याने व २०१९ मध्ये शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवल्याने पालघर वर शिवसेनेचा दबदबा कायम राहिला आहे.

1511 unauthorized constructions on 276 acres in Kudalwadi demolished
कुदळवाडीतील २७६ एकरवरील १ हजार ५११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Babasaheb Kalyani statement regarding Kolegaon Karad news
कराड: कोळे गावाला उंचीवर न्यायचे आहे; बाबासाहेब कल्याणी
important difference between lease transfer and sale deed
भाडेपट्टा हस्तांतरण आणि खरेदीखतमहत्त्वाचा फरक!
10 thousand vacant posts of Anganwadi workers and helpers will be filled
अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची १० हजार रिक्त पदे भरली जाणार
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
Flats in Bhandup Mulund Juhu and Malad for project affected people mumbai print news
मुंबई: प्रकल्पबाधितांसाठी भांडुप, मुलुंड, जुहू आणि मालाडमध्ये सदनिका

हेही वाचा : Vishwa Hindu Parishad : दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून धर्म संम्मेलनाचं आयोजन; भाजपाच्या मदतीसाठी संघ परिवार मैदानात?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढणाऱ्या श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर ४० हजार पेक्षा अधिक मताने पराभव केला होता. शिवसेनेत फूट झाल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यांच्या कारकिर्दीत श्रीनिवास यांनी १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक विशेष निधी आणला तरीही त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला आहे.

दरम्यान, लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर राजेंद्र गावित यांनी पालघर विधानसभा क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मिळालेले मताधिक्य व वैयक्तिक संपर्क आपल्या विजयासाठी पुरेसा असल्याने पालघरची जागा भाजपासाठी सोडावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यानच्या काळात श्रीनिवास वनगा यांनी पालघर विधानसभा क्षेत्र इतकेच लक्ष डहाणू विधानसभा क्षेत्राकडे देखील लक्ष देत असल्याने त्यांना डहाणू येथून उमेदवारी देण्याबाबत पक्षीय स्तरावर विचारविनिमय सुरू आहे.

माजी खासदार गावित यांना सामावून घाय्ण्यासाठी अदला बदल करण्याबाबत चाचपणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून पक्षांतर करून उमेदवारीच्या हेतूने ठाकरे गटात दाखल झालेले डॉ. विश्वास वळवी यांच्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देखील या मतदारसंघात आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

पालघर विधानसभा क्षेत्रात सुमारे एक तृतीयांश भाग हा डहाणू तालुक्यातील येत असल्याने मतदार संघातील वेगवेगळ्या पट्ट्यात विविध राजकीय पक्षांचे प्राबल्य असल्याने विधानसभेची लढत चुरशीची होण्याची अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून सद्यास्थितीत पालघर मधून किमान १२ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, विद्यामान आमदारांना पालघरमधून पुन्हा संधी मिळणार का?याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जनसंपर्क नसल्याचा आरोप

श्रीनिवास वनगा यांनी आपल्या कारकीर्दीत मतदारसंघात जनसंपर्क ठेवला नसल्याचा आरोप होत आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यास त्यांना फारसे यश मिळाले नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून अन्य उमेदवारांची देखील चाचपणी सुरू आहे.

Story img Loader