लोकसभा निवडणुकीच्या या प्रचारामध्ये विविध प्रकारच्या घोषणांमुळे मोठी रंगत आली आहे. त्यातीलच एक घोषणा म्हणजे ‘खटाखट… खटाखट… खटाखट….’ची घोषणा! खरे तर राहुल गांधींनी सुरू केलेल्या या ‘खटाखट’ घोषणेची री ओढून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनसमुदायाचा प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत हा सिलसिला चालूच राहिला आणि यमक जुळवत तयार झालेल्या अशा अनेक शब्दांनी प्रचाराची रंगतही वाढली. इंडिया आघाडी सत्तेत आली तर आम्ही प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षाकाठी एक लाख रुपये देऊ, असे आश्वासन देताना राहुल गांधी यांनी सर्वांत आधी ‘खटाखट’ या शब्दाचा वापर केला. त्यांच्या या ‘खटाखट’ घोषणेला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यावर प्रत्युत्तर देत आपल्या सभेत नरेंद्र मोदींनीही ‘टकाटक’चा प्रयोग केला. ‘खटाखट-टकाटक’ अशा माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे शाब्दिक द्वंद्वयुद्ध पहायला मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा