Ladki Bahin Yojana : मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरु केल्यानंतर याचा प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. त्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेचा प्रभाव अप्रत्यक्षपणे निवडणुकीत दिसून आला. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयात ‘लाडकी बहीण योजने’ने मोठी भूमिका बजावल्याचं बोललं जातं. याचं कारण म्हणजे संपूर्ण निवडणुकीचा प्रचार हा लाडकी बहीण योजनेच्या भोवती राहिला. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकाद महायुतीचं सरकार स्थापन झालं. आता सरकार स्थापन होऊन एक महिना होऊन गेला. खरं तर निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आल्यास २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर सध्या तरी महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. यामध्येही या योजनेसाठी निकष लावले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावरून विरोधकांकडून काही सवाल उपस्थित केले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा