लोकसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, अशी मागणी केली. विरोधकांच्या गोंधळानंतर गुरुवारचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृह सुरू होण्यापूर्वी मणिपूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करणारा एक व्हिडिओ प्रसारीत केला. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा दिली जाईल, असे सांगितले. मात्र मोदींच्या या भाष्यावर विरोधकांनी कडाडून टिका केली. मणिपूरमधील हिंसाचाराला १८०० तास उलटून गेल्यानंतर मोदींनी केवळ ३६ सेकंदाची प्रतिक्रिया दिली असल्याचा आरोप करत विरोधक म्हणाले की, पंतप्रधानांनी या विषयावर सभागृहात बोलावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा