देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असून देशभरात मोदींचा प्रभाव घटतो आहे, असा दावा काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. “जसजसे मतदानाचे टप्पे पार पडतील, तसतसे मोदींसमोरचे आव्हान अधिकच वाढत चालले आहे. त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक अजिबात सोपी नसेल. विरोधकांनी उभ्या केलेल्या आव्हानासमोर मोदींनी आधीच गुडघे टेकलेले आहेत”, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर आपली सडेतोड मते मांडली आहेत. त्यांनी ममता बॅनर्जींवरही कठोर टीका केली असून त्यांच्या हिंसाचाराच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी लढाई देत असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. असे असले तरी ममता बॅनर्जी सरकारविरोधात राज्यात रोष असून या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी केलेली युती नक्कीच प्रभावी ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा