लोकसभा निवडणुकांना केवळ एक वर्ष राहिल्यामुळे देशपातळीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत. त्यांना विरोधकांच्या आघाडीत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काही पक्ष काँग्रेसविरहित तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करत आहेत. तेलंगणाचा भारत राष्ट्र समिती पक्ष आणि पक्षाचे नेते व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर काँग्रेसला वगळून आघाडी करण्यासाठी उत्सुक होते. यासाठी त्यांनी काही पक्षांना एकत्रही केले. मात्र केसीआर यांचा हा प्रयत्न आता मागे पडला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी केसीआर तयार झाले आहेत. मात्र आघाडीत येण्यासाठी त्यांनी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विरोधकांचा चेहरा असू नयेत, अशी अट घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा