सोलापूर: एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादीचा मजबूत गड राहिलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या पाच-दहा वर्षात भाजपने स्वतःची ताकद वाढवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहात असताना भाजपने सोलापूर व माढ्याच्या दोन्ही लोकसभेच्या जागा कायम राखण्यासाठी साम, दंड, भेद नीतीचा अवलंब करत जोरदार तयारी चालविली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपला अनुकूल ठरणा-या संघ परिवारासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत हिंदू जन आक्रोशसारखे मोर्चे आणि त्यातून होणा-या दगडफेकींच्या घटनांमुळे सोलापुरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोकादायक बनू पाहात आहे. त्याबद्दल शांतताप्रेमी सोलापूरकरांना चिंता वाटत आहे. शांतता कायम राखताना समाजात अशांतता निर्माण करणा-या शक्ती कितीही मोठ्या असल्या तरी त्यांचा बिमोड करण्याची कायदेशीर जबाबदरी स्थानिक पोलीस प्रशासनावर येऊन पडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा