इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विकासकामे करताना राजकीय अडथळे येत असल्याने माजी मंत्री प्रकाश आवाडे त्रस्त झाल्याचे दिसतात. एकीकडे प्रशासकीय पातळीवर सहकार्य मिळत नाही. दुसरीकडे विरोधकांचे डावपेच सुरू आहेत अशा दुहेरी कोंडीत ते अडकले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी तर आवाडे यांनी अदृश्य राजकीय शक्ती आडवी येत असल्याचे उघडपणे सांगितले होते. तेव्हा त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करून विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. निवडणूक संपली. शिंदेसेनेचा विजय झाला. आता तरी त्या शक्तीचा उपद्रव संपला का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता आमदार आवाडे यांनी राजकीय शक्ती कार्यरत झाली आहे, अशी संदिग्ध टिपणी केली. म्हणजे त्यांना आड येणारे आता मदत करीत आहेत का, की त्याहून अधिक काही घडत आहे याची नेमकी उकल करण्यात मतदारसंघातील नागरिक गुंतले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा