राष्ट्रवादीत बंटी आव्हाड जेवढे आक्रमक तेवढेच काँग्रेसमधील बंटी पाटील एकदमच नेमस्त. कधी कोणावर चिडणार नाहीत व संयमी, पण अशा या बंटी पाटील यांचा रुद्रावतार दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने बंटी पाटील असे काही संतप्त झाले, की त्यांचा चेहरा लालेलाल झाला होता. खासदार शाहू महाराज व त्यांच्या कुटुंबीयांना उद्देशून बंटी पाटील यांनी चांगलेच सुनावले.

कोल्हापूरमधून लोकसभेत शाहू महाराजांना निवडून आणण्यात बंटी पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. शाहू महाराज यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांची मनधरणी करण्यापासून निवडणुकीचे सारे नियोजन बंटी पाटील यांनी केले होते. यामुळे खासदार शाहू महाराज यांच्या कुटुंबीयांकडून ऐनवेळी दगाफटका होईल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Assembly election 2024  Pen Assembly Constituency Mahavikas Aghadi Election
लक्षवेधी लढत:पेण: शेकापसाठी अस्तित्वाची लढाई
Ajit Pawar warning regarding criticism of Sharad Pawar print politics news
शरद पवारांवरील वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही; अजित पवार यांचा महायुतीच्याच नेत्यांना इशारा

हेही वाचा >>>‘आम्ही काहीही करू शकतो’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मिथुन चक्रवर्तींची मुस्लिमांना धमकी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आधीच उमेदवारीवरून वाद झाला होता. त्यातच शाहू महाराजांनी तोंडघशी पाडल्याने बंटी पाटील यांची चांगलीच कोंडी झाली. कधी नव्हे ते पाटील एवढे चिडले की त्यांचा आवेश बघून कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर बंटी पाटील यांना अश्रू अनावर झाले. आता ज्याची उमेदवारी पक्षाने बदलली त्यालाच अपक्ष म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी पाटील यांच्या खांद्यावर येऊन पडली.

तुतारी आणि थांबलेली पंढरीची वारी!

सार्वत्रिक निवडणुका म्हटले की मतदारांची मर्जी सांभाळणे आलेच. त्यासाठी उमेदवारही वेगवेगळे मार्ग चोखाळत असतात. याचा संदर्भ देत कागलमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मासलेवाईक उदाहरण दिले. या मतदारसंघातील ‘वजनदार’ प्रतिस्पर्धी उमेदवार हे निवडणुकीत उमेदवारांना पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घडवून आणणाऱ्या यात्रा जोमाने काढत असतात. आता मात्र त्यांची अडचण झाली आहे. मतदारांना पंढरीला नेले आणि शपथ घ्यायला लावताना जयघोष केला ‘राम कृष्ण हरी’ आणि मतदारांनी लगोलग म्हटले ‘वाजवा तुतारी!’. अशी भलतीच अडचण व्हायला नको म्हणून त्यांनी आता पंढरीची वारीच थांबवली आहे.

(संकलन : संतोष प्रधान, दयानंद लिपारे)

Story img Loader