रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जात असला तरी दीड वर्षांपूर्वी झालेल्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट दावा करत आहेत. पण त्यांना बाजूला ढकलून महायुतीतील ‘दादा’ भाजपने या ठिकाणी अशा प्रकारे वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे की, दोन्ही शिवसेनांपेक्षा भाजपच इथे वरचढ वाटावा! गेल्या तीन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, मंत्री रवींद्र चव्हाण आणि गोव्याहून खास रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत या तीन वेळा नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचे मिळावे घेतले. तिन्ही नेत्यांनी, या मतदारसंघांवर भाजपचाच अधिकार असल्याचं ठासून सांगितलं. पण, ही जागा भाजप खरंच लढवणार आहे का, या मूळ प्रश्नाला तिघांनीही बगल दिली. दुसरीकडे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण ऊर्फ भय्या सामंत यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्वीच व्यक्त केली असताना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा दबाव भाजपकडून टाकला जात आहे. मात्र या प्रस्तावाला सामंत फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीची अवस्था, ‘मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही,’ अशी झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा