शंभराव्या नाट्य संमेलननिमित्त अहिल्यानगरमध्ये विभागीय नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याचे उद्घाटन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा उद्याोगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात विभागीय नाट्य संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांनी मंत्री उदय सामंत यांच्या भूमिका नेहमीच चर्चेत असतात, असा उल्लेख करत ते गुवाहाटीला गेले, कामाख्या देवीचे दर्शन घेतले, आता दावोसला जाऊन आले, प्रत्येक वेळी त्यांची चर्चा झाली, असे संदर्भ दिले. त्याची परतफेड करताना मंत्री उदय सामंत यांनी आमदार जगताप यांच्या भूमिकेलाही टोला लगावला. सामंत म्हणाले, कुस्तीचे क्षेत्रात असलेला राजकारणी नेहमीच यशस्वी होतो, हे आमदार संग्राम जगताप यांनी दाखवून दिले आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आम्ही दोघेही पटाईत आहोत. मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नसता तर उद्याोगमंत्री झालोच नसतो. जगतापही योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, अशीही अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. त्यावर जगताप कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा