छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात महायुतीत एकमेव मैत्रीपूर्ण लढत आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघात होत आहे. भाजपचे माजी आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) बाळासाहेब आजबे यांना त्यांच्या पक्षाने अधिकृत ए. बी. फॉर्म दिल्याने दोघेही मैदानात असून, भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.

या मतदारसंघात पंकजा मुंडे दसरा मेळावा घेत असलेले सावरगाव घाट (ता. पाटोदा) हे संत भगवान बाबांचे मूळ गाव आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मातोरी (ता. शिरूर) गावही येत असून, मराठा व वंजारी समाजाची जवळपास सारखीच संख्या असल्याने येथे होणारी लढत लक्षवेधी ठरणार आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
minister ashish shelar criticized sharad pawar over conflict in mva
शरद पवारांच्या राजकीय ऱ्हासाला सुरुवात : आशिष शेलार
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’

हेही वाचा : Vinod Tawde: मुख्यमंत्रीपदापेक्षा महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा, भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे प्रतिपादन

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा बराचसा परिणाम अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वत्रच दिसून आल्याचे मानले जात असले तरी या मतदारसंघाने भाजप नेत्या, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना येथून जवळपास ३२ हजारांचे मताधिक्य दिले होते. मराठा व वंजारी समाज प्रत्येकी ३३ ते ३५ टक्के म्हणजे जवळपास सारख्याच संख्येने असलेल्या मतदारसंघात उर्वरित संख्येत माळी, धनगर, दलित व इतर घटकांसह मुस्लीम समुदाय मानला जातो.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार असलेला हा मतदारसंघ भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यासाठी सोडवून घेण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. अखेर त्यांना मतदारसंघ सोडवून घेण्यात काही प्रमाणात यश आले असून, अजित पवार गटानेही दावा सोडला नसल्याने धस यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मकच आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यामान आमदार बाळासाहेब आजबे यांनीही अस्तित्वाची लढाई समजून सर्वस्व पणाला लावले होते. अखेर त्यांनाही पक्षाने ए. बी. फॉर्म देऊन महायुतीने मराठवाड्यातील ही एकमेव मैत्रीपूर्ण ठरवली. त्यातच भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली.

हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात तुल्यबळ

निर्णायक मुद्दे

● मराठा व ओबीसी मतांमधील विभागणी हाच या मतदारसंघातील निर्णयकी मुद्दा असल्याने तो दोन्ही बाजूने दुभंग आहे.

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती : १,४५,२१० ● महाविकास आघाडी : १,१२,९८८

Story img Loader