मुंबई : राज्यात एकेकाळी २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाची तब्बल २१ जिल्ह्यांमध्ये पाटी कोरी राहिली आहे. काँग्रेसची ही निच्चांकी आमदारांची संख्या आहे.

काँग्रेसचे फक्त १६ आमदार निवडून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, नसिम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. सहा महिन्यांर्पू्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक १३ खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण पक्षाची निचांकी कामगिरी झाली आहे. १९७०, १९८०च्या दशकात काँग्रेसचे राज्य विधानसभेत २०० पेक्षा अधिक आमदार निवडून येत असत. काँग्रेसची घट्ट पकड होती, पण हळूहळू काँग्रेसची ताकद कमी होत गेली.

214 flats sold at Thane property exhibition
ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात २१४ सदनिकांची विक्री
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
1511 unauthorized constructions on 276 acres in Kudalwadi demolished
कुदळवाडीतील २७६ एकरवरील १ हजार ५११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
municipality issued possession letters for 60 houses in Khambalpada to Santwadi residents
ठाकुर्लीतील संतवाडीतील रस्ते बाधितांंना खंबाळपाडा, ‘बीएसयुपी’मधील घरे
name of a Bangladeshi was found in the voter list of Narayangaon Gram Panchayat
नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे पकडलेल्या ३ जणांनी काढले होते नारायणगाव येथे आधारकार्ड
More than 70 flats grabbed by 37 housing societies on MHADA plots
म्हाडा भूखंडावरील ३७ गृहनिर्माण संस्थांकडून ७० हून अधिक सदनिका हडप!
10 thousand vacant posts of Anganwadi workers and helpers will be filled
अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची १० हजार रिक्त पदे भरली जाणार
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?

हेही वाचा >>>Maharashtra CM: अजित पवारांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं का ठरेल सोयीचं? एकनाथ शिंदेंसोबत कशी आहेत राजकीय समीकरणं?

या जिल्ह्याचा पक्षाचा एकही आमदार नाही

धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

महत्त्वाच्या जिल्ह्यांत अपयश

पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला नेहमी यश मिळत असे. पुणे जिल्ह्यात पक्षाला भोपळा फोडता आला नाही. सोलापूर जिल्ह्यातही काँगेसची पाटी कोरी राहिली. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसला.

Story img Loader