वर्धा : लोकसभा निवडणुकीतील योगदानाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत सहकार्य मिळावे म्हणून काँग्रेसने ‘भारत जोडो’ अभियानास साकडे घातले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत जोडो’ अभियान या चळवळीचे राष्ट्रीय अधिवेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सेवाग्रामात संपन्न झाले होते. त्यावेळी अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय राहण्याबाबत भाष्य केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘भारत जोडो’ने इंडिया आघाडीस समर्थन दिले होते. आघाडीस मिळालेल्या यशात अभियानाचे योगदान स्पष्ट झाले. महाराष्ट्रात ३० व देशभरात १३६ मतदारसंघात अभियानाने योगदान दिले होते. त्यापैकी अनुक्रमे २० व ७४ लोकसभा मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीस विजय मिळाला, असा दावा सेवाग्रामच्या अधिवेशनात योगेंद्र यादव, तुषार गांधी, उल्का महाजन यांनी केला होता. आता आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत ‘भारत जोडाे’ अभियान सक्रिय राहणार असल्याचे सूतोवाच झाले.

हेही वाचा – सध्याची लोकसभा सर्वांत वयोवृद्ध! तरुण खासदारांची संख्या का घटली?

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या गुरुवारी मुंबईत इस्लाम जिमखाना या ठिकाणी जनसंघटनांसोबत बैठक आयोजित केली आहे. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला संवाद पुढे नेण्यासाठी ही संवाद बैठक आयोजिण्यात आली असल्याचे प्रदेश काँग्रेसने आपल्या निमंत्रणात नमूद केले आहे. ‘भारत जोडो’ अभियानात जुळलेल्या संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित राहणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात ‘इंडिया’ आघाडीसोबत या संघटना ताकदीने उभ्या राहिल्याने अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल या संघटनांचे काँग्रेसने आभार मानत बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे.

या बैठकीत प्रामुख्याने लोकसभेतील कामकाजाचा आढावा, संघटनांचा सहभाग व राजकीय पक्षांसोबतचा संवाद हे मुद्दे राहतील. तसेच या संघटनांची काँग्रेस पक्षाकडून असणारी अपेक्षा, पक्षाच्या जाहीरनाम्यात घ्यावयाचे अपेक्षित मुद्दे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती व कार्यक्रमाची आखणी यावर संवाद होणार आहे. राज्यातील सर्व जनसंघटनांचे किमान दोन प्रतिनिधी बैठकीत सहभागी राहतील.

हेही वाचा – धुळ्यात भाजपचे वरातीमागून घोडे

अभियानाचे प्रमुख नेते अविनाश काकडे म्हणाले की, संवाद बैठकीचे निमंत्रण मिळाले असून वरिष्ठ नेत्यांशी बोलणे झाले आहे. मात्र, ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दोन दिवस कार्यक्रम असल्याने बैठकीत सहभागी होणे शक्य नसल्याचे कळवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील अभियानाच्या भूमिकेबाबत पारदर्शी चर्चा सुरूच राहणार. ‘भारत जोडो’ अभियानाने महाविकास आघाडीचे समर्थन करण्याची भूमिका स्वीकारली असली तरी प्रस्तुत होणाऱ्या जनतेच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देण्याची अट आघाडीतील राजकीय पक्षांपुढे ठेवली आहे.

‘भारत जोडो’ अभियान या चळवळीचे राष्ट्रीय अधिवेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सेवाग्रामात संपन्न झाले होते. त्यावेळी अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय राहण्याबाबत भाष्य केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘भारत जोडो’ने इंडिया आघाडीस समर्थन दिले होते. आघाडीस मिळालेल्या यशात अभियानाचे योगदान स्पष्ट झाले. महाराष्ट्रात ३० व देशभरात १३६ मतदारसंघात अभियानाने योगदान दिले होते. त्यापैकी अनुक्रमे २० व ७४ लोकसभा मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीस विजय मिळाला, असा दावा सेवाग्रामच्या अधिवेशनात योगेंद्र यादव, तुषार गांधी, उल्का महाजन यांनी केला होता. आता आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत ‘भारत जोडाे’ अभियान सक्रिय राहणार असल्याचे सूतोवाच झाले.

हेही वाचा – सध्याची लोकसभा सर्वांत वयोवृद्ध! तरुण खासदारांची संख्या का घटली?

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या गुरुवारी मुंबईत इस्लाम जिमखाना या ठिकाणी जनसंघटनांसोबत बैठक आयोजित केली आहे. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला संवाद पुढे नेण्यासाठी ही संवाद बैठक आयोजिण्यात आली असल्याचे प्रदेश काँग्रेसने आपल्या निमंत्रणात नमूद केले आहे. ‘भारत जोडो’ अभियानात जुळलेल्या संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित राहणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात ‘इंडिया’ आघाडीसोबत या संघटना ताकदीने उभ्या राहिल्याने अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल या संघटनांचे काँग्रेसने आभार मानत बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे.

या बैठकीत प्रामुख्याने लोकसभेतील कामकाजाचा आढावा, संघटनांचा सहभाग व राजकीय पक्षांसोबतचा संवाद हे मुद्दे राहतील. तसेच या संघटनांची काँग्रेस पक्षाकडून असणारी अपेक्षा, पक्षाच्या जाहीरनाम्यात घ्यावयाचे अपेक्षित मुद्दे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती व कार्यक्रमाची आखणी यावर संवाद होणार आहे. राज्यातील सर्व जनसंघटनांचे किमान दोन प्रतिनिधी बैठकीत सहभागी राहतील.

हेही वाचा – धुळ्यात भाजपचे वरातीमागून घोडे

अभियानाचे प्रमुख नेते अविनाश काकडे म्हणाले की, संवाद बैठकीचे निमंत्रण मिळाले असून वरिष्ठ नेत्यांशी बोलणे झाले आहे. मात्र, ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दोन दिवस कार्यक्रम असल्याने बैठकीत सहभागी होणे शक्य नसल्याचे कळवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील अभियानाच्या भूमिकेबाबत पारदर्शी चर्चा सुरूच राहणार. ‘भारत जोडो’ अभियानाने महाविकास आघाडीचे समर्थन करण्याची भूमिका स्वीकारली असली तरी प्रस्तुत होणाऱ्या जनतेच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देण्याची अट आघाडीतील राजकीय पक्षांपुढे ठेवली आहे.