मुंबई : राज्यातील महायुती सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे. पण, सध्या सरकारकडे पैसा नाही आणि निवडणूक होणार असल्याने त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. त्यामुळे केवळ मते मिळवण्यासाठी महायुती सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी येथे केली.

हेही वाचा >>> मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा

sharad pawar marathi news
‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Four former corporators from Ajit Pawars NCP warn that Mahavikas Aghadi option remains open
चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा भाजपचे…’ अजितदादांच्या माजी नगरसेवकांचा इशारा
Sharad Pawar statement that Sitaram Yechury contribution is important in the stability of the United Progressive Alliance government
‘संपुआ’ सरकारच्या स्थिरतेत येचुरींचे योगदान महत्त्वाचे; शरद पवार यांच्याकडून आठवणींना उजाळा
anil bonde controversial remark on rahul gandhi
राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक ; पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिय्या
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी आज मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. तसेच चरख्यावर सूत कातून भजन गायनही केले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चेन्नीथला यांनी महायुती सरकारवर टीका केली. गांधी विचारच जगाला तारणारा असून धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी गांधी विचार अवलंबावा, असे आवाहन त्यांनी केले.

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार आणि गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण आणि इस्रायलमध्ये आज जे सुरू आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गांधींजींनी घालून दिलेला आदर्श आणि अहिंसेचा मार्गच महत्त्वाचा ठरतो, असे चेन्नीथला यांनी सांगितले.