मुंबई : राज्यातील महायुती सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे. पण, सध्या सरकारकडे पैसा नाही आणि निवडणूक होणार असल्याने त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. त्यामुळे केवळ मते मिळवण्यासाठी महायुती सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी येथे केली.

हेही वाचा >>> मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा

Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Image of Amit Shah
Amit Shah : “पवार साहेब महाराष्ट्राला हिशोब द्या, तुम्ही सहकार क्षेत्रासाठी काय केले”, अमित शाह यांचा थेट सवाल
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
Yogi Niranjan Nath selected as Chief Trustee of Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee
आळंदी : योगी निरंजन नाथ यांची संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्त पदी निवड

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी आज मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. तसेच चरख्यावर सूत कातून भजन गायनही केले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चेन्नीथला यांनी महायुती सरकारवर टीका केली. गांधी विचारच जगाला तारणारा असून धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी गांधी विचार अवलंबावा, असे आवाहन त्यांनी केले.

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार आणि गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण आणि इस्रायलमध्ये आज जे सुरू आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गांधींजींनी घालून दिलेला आदर्श आणि अहिंसेचा मार्गच महत्त्वाचा ठरतो, असे चेन्नीथला यांनी सांगितले.

Story img Loader