Uddhav Thackeray BJP News : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची २५ वर्षांची युती तुटली. मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत न झाल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तास्थानी आली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत उभी फूट पडल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपाला सातत्याने लक्ष्य केलं आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातूनही भाजपावर अनेकदा टीका करण्यात आली. मात्र, ५ वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे आणि त्यामुळेच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा