अलिबाग : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १५ जागांसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली. तिन्ही जिल्ह्यांत सुमारे ७० टक्के मतदान झाले. मतदानासाठी मुंबईतून हजारोंच्या संख्येने मतदार कोकणात दाखल झाल्याचे पहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात चिपळूण, दापोली, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी मतदारसंघांचा समावेश आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ६०.३५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दापोलीत सर्वाधिक ६५ टक्के तर रत्नागिरीत सर्वांत कमी ५९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना सोडल्या तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा