देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत. सात टप्प्यांत होणार्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान १९ एप्रिलला पार पडले. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरली. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील राजकरणाचे चित्र बदलले आहे. त्यावरून कुठे न कुठे लोकांच्या मनात संभ्रम असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला हरविण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या, एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पक्ष एकत्र आले, इंडिया आघाडी गट स्थापन झाला, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे दोन भाग झाले, राज ठाकरेंनी मोदींना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला, तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा