अलिबाग: कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघात, पुन्हा एकदा दोन तुल्यबळ उमेदवारांमधील लढाई पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यात होणार आहे. दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन लढतींमध्ये १-१ अशी बरोबरी झाली आहे. यामुळे तिसरी लढत उभयतांसाठी तेवढीच महत्त्वाची आहे.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत गीते विरुध्द तटकरे अशा लढतीचा पहिला अंक पार पडला होता. देशभरात मोदी लाट असतांना सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना शेवटच्या फेरी पर्यंत झुंजवले होते. अटीतटीच्या लढतीत गीते जेमतेम दोन हजार मतांनी निवडून आले होते. तेव्हा सुनील तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला ज‌वळपास नऊ हजार मते मिळाली होती.

Imtiaz Jaleel, constituency, contest,
इम्तियाज जलील कोणत्या मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता कायम, संभाजीनगर पूर्व की मध्यचा पर्याय निवडणार ?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
pakistan security 1
नंदनवनातील निवडणूक: पाकिस्तानप्रेमी ‘जमात’ आता निवडणुकीच्या रिंगणात
Thackeray Group, Sushma Andhare, Vadgaon Sheri assembly, Pune, Assembly Elections, Flexes, Uddhav Balasaheb Thackeray, Shiv Sena,
सुषमा अंधारे यांना ‘या’ मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून पुण्यात लागले फ्लेक्स
Loksatta karan rajkaran Who is the alternative to Sunil Kedar for assembly election 2024  in Savner constituency
कारण राजकारण: सावनेरमध्ये केदार यांना पर्याय कोण?
Will Bhaskar Jadhav change constituency for son vikrant jadhav
भास्कर जाधव मुलासाठी मतदारसंघ बदलणार? पराभवाचा डाग पुसण्यासाठी आता…
After NCP claimed Chinchwad now BJP is claiming Pimpri constituency
पिंपरी : राष्ट्रवादीने चिंचवडवर दावा केल्यानंतर आता भाजपचा ‘या’ मतदारसंघावर दावा
Nana Patole will contest assembly elections from Sakoli constituency
नाना पटोले ‘या’ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार…

हेही वाचा : “सूरतमध्ये जे झालं ते फारच वाईट, पण काँग्रेस डबघाईला आल्यास काय करणार?” विजय रुपाणींचा हल्लाबोल

२०१९ मध्ये पुन्हा एकदा देशात मोदी लाटेचा प्रभाव होता. मात्र यावेळी तटकरे यांनी अनंत गीते यांचा ३० हजार मतांनी पराभव केला होता. म्हणजेच या दोन्ही निवडणूकीत मोदी लाटेचा प्रभाव फारसा दिसून आला नाही. या निवडणूकीत रायगडचे मतदार मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मतदारसंघातील बदलेली राजकीय समीकरणे आणि मुस्लिम आणि बहुजन मतांचे ध्रुवीकरण करण्याची होत असलेले प्रयत्न यामुळे ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी पुन्हा एकदा आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून शेकाप आणि काँग्रेसचे खासदार मतदारसंघातून आलटून पालटून निवडून येत असत. पण काळानुरूप मतदारसंघात दोन्ही पक्षांची वाताहत झाली. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात नाहीत. त्यांची जागा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतली आहे.

हेही वाचा : मोदींची ‘विदाई’ बिहारमधून होईल म्हणणारा उमेदवारच देऊ लागला चारशेपारच्या घोषणा

गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्याने दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे. दोन्ही गट परस्पर विरोधी गटात सहभागी झाले आहेत. युती आघाडीच्या राजकारणाची समिकरणे ३६० अंशाच्या कोनात बदलली आहे. त्यामुळे मतदारही काहीसे संभ्रमावस्थेत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपची भक्कम साथ तटकरे यांच्यासाठी जमेची आहे. मात्र त्याच वेळी मुस्लिम आणि बहुजन मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. दुसऱ्या बाजूला मुस्लिम आणि बहुजन मतांचे होणारे ध्रुवीकरण अनंत गीतेसाठी फलदायी ठरण्याची शक्यता आहे. शेकापची साथही त्यांना यंदा मिळणार आहे. मात्र त्याच वेळी शिवसेनेत पडलेली उभी फूट, त्यामुळे ठाकरे गटाची मतदारसंघात झालेली वाताहत आणि विरोधी पक्षांचा सातत्याने घटणारा प्रभाव गीतेंसाठी अडचणीचा असणार आहे. मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. हा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहणार यावर दोन्ही उमेदवारांच भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेना ठाकरे गटातही सारे आलबेल नाही. गेल्या आठवड्यात भास्कर जाधव आणि गीतेंमध्चे व्यासपीठावर घडलेल्या प्रकारावरून हे समोर आले होते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?

वंचित बहुजन आघाडीने कुमूदीनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. पण सध्यातरी त्या मतदारांवर कितपत प्रभाव पाडतील याबाबत साशंकता आहे.

ही लढाई भ्रष्टाचारा विरुध्द सदाचाराची लढाई आहे. ज्यांनी मतदारांचा विश्वासघात केला, पक्षाशी गद्दारी केली, मित्र पक्षांना फसवले, त्यामुळे त्यांना मतदार या निवडणूकीत धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत.

अनंत गीते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

सहा वेळा खासदार आणि दोन केंद्रीय मंत्रीमंडळात असूनही गीते जिल्ह्यात एकही प्रकल्प आणू शकले नाहीत. खासदार निधी संपविण्याकडे त्यांनी काही केलेले नाही. गेल्या पाच वर्षात ते कुठेच दिसले नाहीत. या उलट मी सतत मतदारसंघात होतो. त्यामुळे सक्रीयता विरोधात निष्क्रीयता अशी ही लढाई आहे.

सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)

हेही वाचा : ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, काँग्रेसकडे देशाला देण्यासारखं काही राहिलेलं नाही

मतदारसंघातील पक्षीय बलाबल…..

विधानसभेतील सद्यस्थिती

अलिबाग- शिवसेना शिंदे गट

पेण- भाजप

महाड- शिवसेना शिंदे गट

श्रीवर्धन- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

दापोली- शिवसेना शिंदे गट

गुहागर- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट