चंद्रशेखर बोबडे

शिवसेनेच्या यवतमाळ -वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करून यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार करणारे हरीश सारडा यांनी रविवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत गवळींच्या मुद्यावर मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Chhagan Bhujbal claims that Gopinath Munde was thinking of forming separate party
गोपीनाथ मुंडे वेगळा पक्ष काढण्याच्या विचारात होते, छगन भुजबळ यांचा दावा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Thane crime bhiwandi gangster sujit patil alias tatya arrested from igatpuri
१४ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात भिवंडीचा ‘तात्या’ अटकेत; खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला होता लोकसभेत विषय
BJP to form government in Delhi after 27 years
‘आम आदमी’ची करामत; २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजप, केजरीवालांसह‘आप’चे प्रमुख नेते पराभूत
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

विशेष म्हणजे, याच हरीश सारडा यांनी यापूर्वी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन खासदार गवळी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळेच सारडा पत्रकार परिषदेत गवळींविरुद्ध काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. मात्र सुरुवातीलाच त्यांनी आपण गवळींच्या मुद्यावर काहीही बोलणार, नाही असे जाहीर केले. सत्तांतरानंतर सारडा यांच्या बदललेल्या भूमिकेने अनेक नव्या शंकांना जन्म दिला आहे. खा. गवळी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाचे रान उठवणारे सारडा यांचा सत्तांतरानंतर विरोध मावळला की, गवळीविरोधी मोहिमेला भाजपची फूस होती? अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

राज्यात सत्ताबदल झाल्यावर सारडा यांनी मुंबईत जाऊन शिंदे-फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचे छायाचित्रही माध्यमांमध्ये झळकले होते. या पार्श्वभूमीवर सारडा यांनी गवळी भ्रष्टाचार प्रकरणावरील मौन महत्त्वाचे ठरते. कारण सारडा यांनी भर पावसाळ्यात पाणी प्रश्नाच्या (वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प) मुद्यावर नागपुरात येऊन तातडीने पत्रकार परिषद घेणे ही बाबही अनाकलनीय ठरते. त्यांना हा मुद्दा वाशीममध्ये मांडता आला असता किंवा तो उन्हाळ्यात मांडणे सयुक्तिक ठरले असते. त्यामुळे सारडा यांना गवळी प्रकरणावरच पत्रकार परिषदेत बोलायचे होते व नंतर दबाव आल्यावर त्यांनी पाण्याचा मुद्दा पुढे केला का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासंदर्भात सारडा यांना विचारले असता ही राजकीय विषयावरील पत्रकार परिषद नव्हती, अशी सारवासारव त्यांनी केली.

Story img Loader