जयेश सामंत
नवी मुंबई : भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद आपल्या मुलाच्या पदरात पडताच राज्याचे माजी मंत्री आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे आमदार गणेश नाईक नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रिय झाले असून मंगळवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शहरातील संपूर्ण १११ महापालिका प्रभागांसाठी त्यांनी आयोजित केलेल्या विशेष जनता दरबारामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिकेतील १११ प्रभागांपैकी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक जागा या बेलापूर विधानसभा मतदारसंघात मोडतात. या मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि गणेशदादांमधील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रूत आहे. असे असताना नाईकांच्या या जनता दरबारामुळे भाजपच्या गोटातही तर्कवितर्कांना उधाण आले असून मंदाताई समर्थक सावध झाल्याचे पहायला मिळत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा