पंढरपूर : महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. निवडणून येईल हा निकष आहे. महाविकास आघाडी १८० जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण होणार हे फडणवीस यांनी ठरवावे, अशी बोचरी टीकाही थोरात यांनी केली. या वेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

हेही वाचा >>> ठाणे : अक्षय शिंदे याचा मृतदेह पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दफन

Jagan Mohan Reddy
Tirupati Laddu Row : “आधी धर्म सांगा मग तिरुपतीचं दर्शन घ्या”, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती दर्शनाचा बेतच रद्द केला
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Nana Patole and Prithviraj Chavan Allegation on Devendra Fadnavis
Akshay Shinde Encounter : “देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला?” काँग्रेस नेत्यांचा सवाल
manoj jarage patil pc
“देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!
gulabrao patil on sanjay raut
Gulabrao Patil: “संजय राऊत अपना माल, अन् उद्धव ठाकरे…” गुलाबराव पाटलांची टोलेबाजी
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात अकलूज येथील कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भाजपावर टीका केली. भाजपाची कृती लोकशाही विरोधी आहे. ऑपरेशन लोटस याचा अर्थ पैसा द्यायचा व आमदार फोडायचा असा आहे. जनतेला भाजपाची नीती समजली आहे असे ते म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांना मोठी संधी मिळाली होती. त्यांच्याकडे क्षमता आहे. भाजपात जाऊन चुकले असे वाटते. त्यांचे व्यक्तिमत्त्व काँग्रेस विचारसरणीत घडले आहे, असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांची पाठराखण केली.

मराठा समाजाला न्याय मिळावा

मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या बाबत प्रयत्न केले. आमची सत्ता गेली. त्यानंतर न्यायालयात बाजू मांडली नाही. मात्र १६ टक्के आरक्षण देणे शक्य आहे असे थोरात म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण व संधी मिळाली पाहिजे मग कोणत्याही पद्धतीने मिळावी असे त्यांनी मत मांडले. राज्यात महायुती बाबत नाराजी आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असल्याचे थोरात यांनी सांगितले.