औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केल्याने सुमारे २८ वर्षांनंतर राज्यातील कोणत्याही शहरांच्या नावांत बदल झाला आहे. ‘बॉम्बे’चे मुंबई नामांतर करावे, अशी अनेक वर्षांची मागणी होती. शिवसेनेने यासाठी आंदोलन केले होते. १९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यावर तत्कालीन महापौर छगन भुजबळ यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला मुंबई नावाची पाटी लावली होती. राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यावर बॉम्बेचे मुंबई नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात आला होता. यानुसार १९९५ मध्ये मुंबई हे नाव अधिकृतपणे अंमलात आले.

मधल्या काळात देशातील अनेक मोठ्या शहरांची नावे बदलण्यात आली. मद्रासचे चेन्नई झाले. कलकत्ताचे कोलकाता झाले. बंगळुरचे बंगळुरू, बेळगावचे बेळगावी, म्हैसूरचे म्हैसूरू अशा पद्धतीने कर्नाटकातील बहुतांशी शहरांची नावे बदलण्यात आली. ही नावे बदलताना कन्नड नावानी ही शहरे ओळखली जातील, अशी व्यवस्था करण्यात आली.

mhada houses lottery news in marathi
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी उद्या सोडत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात सोडतीचा कार्यक्रम
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
Pune Municipal Corporation , Tax , Elections ,
पुणेकर झाले खूश, यंदा करवाढ नाही!
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण

हेही वाचा – मनिष सिसोदियांच्या अटकेनंतर विरोधकांची एकजूट, काँग्रेस मात्र गप्प; जाणून घ्या कोणत्या पक्षाची काय भूमिका?

हेही वाचा – Exit Polls: त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपा सत्ता राखेल; मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची मागणी शिवसेनेचीच होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी केली होती. याबरोबबरच उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सत्ताबदल होताच शिंदे सरकारने पुन्हा नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले आहे. जवळपास तीन दशकांनंतर राज्यातील दोन शहरांच्या नावांमध्ये बदल झाला आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा पद्धतीने नावांमध्ये बदल झाला. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे. अर्थात त्यावरून नगर जिल्ह्यात सत्ताधारी भाजपमध्येच एकमत नाही. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नामांतराला विरोध आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात यावर नगरचे नामांतर अवलंबून असेल.

Story img Loader