मुंबई : राज्यातील सुमारे एक कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा केल्यानंतर महायुती सरकारने आपला मोर्चा आता शेतकऱ्यांकडे वळविला आहे. त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यापोटी सुमारे एक कोटी २० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे २०४१ कोटी २५ लाख रुपये जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जून २०२३ पासून राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या बरोबरीने नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेतून राज्य सरकारमार्फत आतापर्यंत तीन हप्त्यात पाच हजार ५१२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : “आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
palghar assembly election 2024
कारण राजकारण: पालघरच्या ‘सुरक्षित’ जागेसाठी महायुतीत चुरस
mahavikas aghadi marathi news
प्रजा म्हणते, मुंबईत “मविआ”चेच आमदार अव्वल!
rajya sabha bjp candidate dhairyasheel patil
रायगडच्या पाटलांमुळे स्मृती इराणींची संधी हुकली
Shilpa Shetty Post on Ladki Bahin Yojana
Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

हेही वाचा : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

एप्रिल ते जुलै या चार महिन्यांतील प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एक कोटी २० लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी २०४१ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा : “मोदीशहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका!”, मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन

कापूस, सोयाबीन अनुदान वाटपातून मतपेरणी

मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यात झालेली धूळधाण आणि विदर्भात घटलेला जनाधार पुन्हा मिळविण्यासाठी महायुती सरकारचा खटाटोप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानाचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे.