अलिबाग : रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत सुरु झालेला वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधील दोन्ही घटक पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे सामोपचाराने यावर तोडगा निघेल अशी चिन्ह दिसून येत नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी म्हसळा आणि तळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले होते. यात रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आणि सुनील तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील, आमचा पक्ष पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवेल असे त्यांनी जाहीर केले होते. भाजपने कितीही दावा सांगितला तरी रायगडची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले होते.

अजित पवार यांच्या या घोषणेनंतर भाजप एक पाऊल मागे येईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. भाजप अजूनही या जागेसाठी आग्रही असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पेण येथे झालेल्या पक्षाच्या बुथ कार्यकर्ता मेळाव्यात भाजपने पुन्हा एकदा या जागेवर दावा सांगितला. यावेळी भाजपचे पक्ष निरीक्षक आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत उपस्थित होते. ही जागा भाजपला मिळायला हवी आणि धैर्यशील पाटील हेच उमेदवार असायला हवेत, नाहीतर फार वाईट घडेल असा थेट इशाराच आमदार रविंद्र पाटील यांनी या मेळाव्यात पक्षनिरक्षकांना देऊन टाकला.

BJP worried about defection before Legislative Assembly seat allocation in Maharashtra
महाराष्ट्रात जागावाटपापूर्वी भाजपला पक्षांतराची चिंता? २३ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध भाजपमध्ये नाराजी का?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
bjp leader harshvardhan patil marathi news
हर्षवर्धन पाटील यांची महायुतीतील नेत्यांवर नाराजी, इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम; लवकरच निर्णय
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
Sharad Pawar, Vidarbha tour, sharad pawar in Nagpur, sharad pawar vidarbh tour, Nagpur,
शरद पवार नागपुरात, दणक्यात स्वागत; नेत्यांच्या भेटीगाठींकडे लक्ष
Ajit Pawar gets emotional at the Women Gathering The Security Shield of Sisters Around Me
‘माझ्याभोवती बहिणींच्या राख्यांचे सुरक्षा कवच’; महिला मेळाव्यात अजित पवार भावनिक
jitendra awhad on uddhav thackeray
Jitendra Awhad : “महाराष्ट्रात अराजकता माजली आहे”, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त एवढेच लक्षात ठेवा…”

हेही वाचा : जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच

त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद पन्हा ऊफाळून येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे रायगडचे उमेदवार नको, असा अट्टाहास भाजपच्या जिल्हाकार्यकारीणीने लावून धरला आहे. आधी पक्षाचे कोकण संघटक असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्याकडे आणि आता पक्ष निरीक्षक असलेल्या प्रमोद सावंत यांच्याकडे त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. अखेर कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्टींकडे पोहोचवीन, कोकणच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे प्रमोद सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपच्या या आक्रमक भुमिकेमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मात्र चांगलीच कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : मोदींच्या सभेने महायुतीचा उत्साह वाढला, यवतमाळ मतदारसंघ भाजप की शिंदे गटाकडे ?

लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे. तसा दोन्ही पक्षातील तणाव आणि धूसफूस वाढण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेनी विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे जागा त्यांनाच मिळावी, तेच योग्य आहे, असे म्हणत तटकरेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी यावर कोणता तोडगा काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.