केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षावरही अशीच कार्यवाही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान किती पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता? निवडणूक झाल्यानंतर किती पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेण्यात आला? यावर नजर टाकू या.

पहिल्या निवडणुकीच्या अगोदर १४ राष्ट्रीय पक्ष

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अहवालानुसार देशातील पहिल्या निवडणुकीच्या अगोदर १४ राष्ट्रीय पक्ष होते. यामध्ये ऑल इंडिया भारतीय जनसंघ, बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय), द फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी), फॉरवर्ड ब्लॉक (रुईकर गट), अखिल भारतीय हिंदू महासभा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, कृषीकर लोक पार्ट, भारतीय क्रांतिकारी कम्युनिष्ट पार्टी, अखिल भारतीय रामराज्य परिषद, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, समाजवादी पक्ष या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती.

Donald Trump vs Kamala Harris Presidential Debate 2024
Donald Trump vs Kamala Harris Debate: कमला हॅरिस यांचा आत्मविश्वास दिसला; ट्रम्प यांनी वरचढ होण्याची संधी गमावली, वाद-विवादात काय काय झाले?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Sarbanand Sonowal asserts that the port is an attraction for the world
वाढवण बंदर जगासाठी आकर्षणबिंदू -सोनोवाल
Why did prakash ambedkar refrain from commenting on the BJP-Sangh coordinators question
भाजप-संघ समन्वयकाच्या प्रश्नावर आंबेडकरांनी भाष्य का टाळले?
Sharad Pawar
Sharad Pawar: ‘त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत’, राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांबाबत शरद पवारांचे सूचक विधान
Rashtriya Swayamsevak Sanghs Public sunil ambekar Comment on BJP Relationship
भाजपबरोबरचे ‘मुद्दे’ ही ‘कौटुंबिक बाब’; राष्ट्रीय स्वयंसेवक संघांकडून संबंधावर प्रथमच जाहीर भाष्य
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

निवडणुकीनंतर चार पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहिला

मात्र निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यांपैकी फक्त चार पक्षांचाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. निवडणुकीनंतर १९५३ साली काँग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष (सोशालिस्ट पार्टी, किसान मजदूर संघाच्या विलीनीकरणानंतर हा पक्ष स्थापन झाला.) सीपीआय, जनसंघ या चार पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहिला.

२९ पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याची मागणी केली होती

याबाबत निवडणूक आयोगाच्या ‘लिप ऑफ फेथ- जर्नी ऑफ इंडियन इलेक्शन्स’ या पुस्तकात सविस्तर लिहिलेले आहे. “निवडणुकीच्या आधी एकूण २९ पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. मात्र यातील १४ पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीच्या निकालानंतर ६ फेब्रुवारी १९५३ रोजी फक्त चार पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली,” असे या पुस्तकात म्हटलेले आहे.

निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेऊन निर्णय

दरम्यान, भारताच्या राजकारणात आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व नष्ट झालेले आहे. तर काही पक्षांचे विलीनीकरण झालेले आहे. सीपीआय पक्षाचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे. सीपीआयची २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

पक्षाला दिल्लीमध्ये कार्यालयासाठी जागा दिली जाते

सध्या देशात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, आम आदमी पार्टी, सीपीआय (मार्क्सवादी), बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी या सहा पक्षांचा यात समावेश आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर बरेच फायदे मिळतात. यामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास पक्षाचे निवडणूक चिन्ह राखीव ठेवले जाते. तसेच पक्षाला दिल्लीमध्ये कार्यालयासाठी जागा दिली जाते.