पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन केले. या उदघाटनाच्या निमित्ताने सेन्गोल राजदंडाचा इतिहासावरून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. ब्रिटिशांनी सत्तेचे हस्तांतर म्हणून पंडीत नेहरुंकडे सेन्गोल सुपूर्द केला होता, असा दावा करण्यात आला होता. ‘सत्तांतराचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या हाती सेन्गोल दिल्याचा कोणताही पुरावा नाही. माऊंटबॅटन, राजाजी आणि पं. नेहरू यांच्याशी संबंधित कोणतेही दस्तऐवज भाजपचा दावा सिद्ध करत नाहीत.”, अशी भूमिका भाजपावर टीका करत असताना जयराम रमेश यांनी मांडली होती. त्यांच्या भूमिकेला पूरक असे वक्तव्य तिरुवदुथुराई अधिनम मठाधिपतींनी केले आहे. द हिंदू दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले, “भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत असताना लॉर्ड माऊंटबॅटन यांना सेन्गोल दिल्याची कोणतीही ठोस माहिती आढळत नाही.” मठाधिपतींच्या या मुलाखतीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली असून भाजपाची फेक फॅक्टरी यानिमित्ताने उघड झाल्याची टीका त्यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा