विरोधक एकत्र येत असल्यामुळे भाजपा पक्षाचे नेते निराश झाले असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलेली सीबीआयची नोटीस ही त्या नैराश्याचे प्रतिबिंब आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागच्या आठवड्यात नितीश कुमार यांनी राजधानी दिल्लीत जाऊन काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. नितीश कुमार म्हणाले की, आणखी काही पक्षांशी संवाद साधून माझ्यापुरती जबाबदारी मी पूर्ण करेन. त्यानंतर जागावाटप आणि एकत्रित प्रचार करण्याच्या रणनीतीबाबत सर्व एकत्र येऊन चर्चा करतील आणि निर्णय घेतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा