देशातील सर्वच पक्ष २०२४ साली मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. भाजपा वेगवेगळ्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने कर्नाटकमधील जेडीएस पक्षाशी युती केली आहे. दुसरीकडे तामिळनाडूतील एआयएडीएमके पक्षाने भाजपाशी असलेली युती तोडली आहे. असे असतानाच आता ओडिसा राज्यात भाजपा आणि सत्ताधारी पक्ष बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षांत युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवीन पटनाईक यांनी दिले १० पैकी ८ गुण

बीजेडी पक्षाने मोदी सरकारच्या धोरणाला यापूर्वी अनेकवेळा पाठिंबा दिलेला आहे. बीजेडी पक्षाचे सर्वेसर्वा तथा ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मोदी सरकारला परराष्ट्र धोरण आणि भ्रष्टाचारावरील नियंत्रण या बाबतीत १० पैकी आठ गुण दिले आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. याच कारणामुळे भविष्यात भाजपा आणि बीजेडी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रविवारी ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना नवीन पटनाईक यांनी मोदी यांची स्तुती केली.

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Narendra Modi On Budget 2025
Narendra Modi : “भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प”, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक
JPC Waqf Amendment Bill by approving 14 amendments moved by NDA members
वक्फ विधेयकाला हिरवा कंदील; रालोआच्या १४ दुरुस्त्या ‘जेपीसी’मध्ये मंजूर, विरोधकांच्या सर्व सूचना अमान्य
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
marathi sahitya sammelan loksatta news
अन्वयार्थ : हा रमणा थांबवा!

दोन पक्षांत होती ११ वर्षे युती

बीजेपी आणि बीजेडी या दोन्ही पक्षांत साधारण ११ वर्षे युती होती. मात्र, २००९ सालच्या निवडणुकीआधी पटनाईक यांनी ही युती तोडली होती. २६ डिसेंबर १९९७ रोजी स्थापन झालेल्या बीजेडी या पक्षाने १९९८, १९९९, २००४ सालची लोकसभा; तर २००० आणि २००४ सालची विधानसभा निवडणूक भाजपाला सोबत घेऊन लढवली होती. २००८ सालच्या ऑगस्ट महिन्यात कंधमाल येथे दंगल झाली होती. याच दंगलीनंतर बीजेडीने भाजपाशी असलेली युती तोडली होती. यावेळी २००९ सालची लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांचे प्रतिनिधी चंदन मित्रा यांच्याशी नवीन पटनाईक यांची युतीसंदर्भात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर त्यांनी भाजपाशी असलेली युती तोडली होती.

काडीमोड केल्यामुळे भाजपाला तोटा

नवीन पटनाईक यांनी युती तोडल्यामुळे ओडिसा राज्यात भाजपाला फटका बसला होता. ही युती तुटल्यानंतर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती; तर विधानसभा निवडणुकीत ६ जागांवर भाजपाचा विजय झाला होता. २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत युतीत असताना भाजपाचा ३२ जागांवर, तर लोकसभेच्या निवडणुकीत ७ जागांवर विजय झाला होता.

“युती तोडण्याचा निर्णय मास्टरस्ट्रोक होता”

भाजपा आणि बीजेडी यांच्यातील अगोदरच्या युतीबाबत बीजेडी पक्षाच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली. “नवीन पटनाईक यांनी भाजपाला सोडण्याचा निर्णय मास्टरस्ट्रोक होता. ही युती तोडल्यामुळे पटनाईक यांची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा करण्यात आली होती. युती तुटल्यानंतर २००९ सालच्या निवडणुकीत बीजेडीने १२९ जागांपैकी एकूण १०३ जागांवर विजय मिळवला होता; तर लोकसभा निवडणुकीत एकूण २१ पैकी १४ जागा या बीजेडी पक्षाने जिंकल्या होत्या. २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतही बीजेडी पक्ष अधिक मजबूत झाला”, अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिली.

नवीन पटनाईक यांची भूमिका भाजपाला पूरक

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीआधी २०१३ साली नवीन पटनाईक यांनी आमचा पक्ष मोदी यांना पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, २०१४ साली भाजपाचा विजय झाला. त्यानंतर मात्र पटनाईक यांनी यू टर्न घेतला. तेव्हापासून नवीन पटनाईक यांची तसेच त्यांच्या पक्षाची भूमिका ही भाजपासाठी पूरकच राहिलेली आहे. पटनाईक यांनी मोदींनी केलेल्या नोटबंदीला पाठिंबा दिला होता. तसेच पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही त्यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तीन तलाक, कलम ३७० रद्दबातल करण्याचा निर्णय, दिल्लीसाठीचे एनसीटी विधेयक अशा वेगवेगळ्या क्षणी बीजेडी पक्षाने भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. विरोधकांनी नुकतेच दाखल केलेल्या अविश्वास ठरवावेळी बीजेडी पक्षाच्या खासदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केले होते.

दोन्ही पक्ष एकत्र येणार का?

दरम्यान, बीजेडीने युती तोडल्यामुळे ओडिसा राज्यात भाजपाला तोटाच झाला आहे. सध्या नवीन पटनाईक यांची भूमिका ही भाजपा आणि एनडीएसाठी पूरकच राहिलेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे आगामी राजकीय फायदा लक्षात घेता हे दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader