“विजेता दुसऱ्या स्थानी असतो”
१९८९ साली लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी हे विधान केले होते. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने संसदेतील दोन जागांवरून तब्बल ८५ जागा पटकावण्याचा विक्रम केला होता. हा तोच काळ होता, जेव्हा भाजपा राष्ट्रीय पक्ष म्हणून राजकीय पटलावर उदयास येऊ लागला होता. काल सोमवारी (२४ जून) १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या अधिवेशनामध्ये विरोधकांच्या देहबोलीमध्ये आत्मविश्वास होता, चेहऱ्यावर विजयाचे तेज होते. लालकृष्ण आडवाणी यांनी केलेल्या त्याच विधानाची लकाकी विरोधकांच्या हालचालींमधून स्पष्ट जाणवत होती. जवळपास एक दशकानंतर देशातील विरोधी पक्षांना सत्ताधाऱ्यांशी तुल्यबळाने दोन हात करता येतील इतक्या जागा मिळाल्या आहेत. मागील दोन्ही लोकसभांमध्ये विरोधक सभागृहातील फक्त पहिल्या दोन ओळीच व्यापू शकायचे; आता तेच विरोधक जवळपास एक-तृतियांश सभागृह व्यापताना दिसून आले. सारांश एकच- विरोधकांचे बळ आणि आत्मविश्वास वाढला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा