सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर साधकबाधक चर्चा सुरू आहे. यादरम्यान अर्थसंकल्पावर भाषण करताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमकर्मींसंदर्भात केलेली मागणी चर्चेत आली आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कर्मचाऱ्यांना एका काचेच्या खोलीपुरती जागा संसदेमध्ये प्रदान करण्यात आली आहे. करोना काळापासूनच संक्रमणाचे कारण देत माध्यमकर्मींचा संसदेतील प्रवेश फारच कमी करण्यात आला असून, आता ज्यांना प्रवेश आहे त्यांनाही एका काचेच्या एका खोलीमध्ये बंद राहावे लागत आहे. सहसा खासदारांशी वार्तालाप करण्यासाठी माध्यमकर्मी ‘मकर द्वार’समोरील जागेमध्ये उपस्थित असतात. मात्र, आता त्यांना ती जागाही रिकामी करण्यास सांगण्यात आले असून, काचेच्या एका बंद खोलीमध्ये त्यांच्या उपस्थितीसाठीचे स्थान निश्चित करण्यात आले आहे. याबाबतच राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी करीत त्यांना संसदेमध्ये खुलेपणाने वावरता यावे, अशी मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा