केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर असे पाच दिवस संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा गुरुवारी (३१ ऑगस्ट) केली. मुंबई येथे इंडिया आघाडीची तिसरी बैठक गुरुवार आणि शुक्रवारी (३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर) संपन्न झाली. केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनाच्या गुगलीमुळे इंडिया आघाडीतील नेते मात्र बुचकळ्यात पडले. पुढील वर्षी प्रस्तावित असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना राबविण्यासाठी कदाचित हे अधिवेशन बोलावण्यात आलेले असू शकते, अशी एक शंका विरोधकांच्या गटामध्ये आहे. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणाले की, विरोधकांची बैठक आणि अदाणी समूहावर झालेले नवे आरोप, यावरून लक्ष वळविण्यासाठी मोदींच्या शैलीत बातम्यांचे व्यवस्थापन करण्यात आल्याचे, या निर्णयातून दिसत आहे. तर राहुल गांधी म्हणाले की, या निर्णयावरून सत्ताधारी अस्वस्थ झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा