सांगली/ कराड : महाविकास आघाडीची सत्ता आल्यास जयंत पाटील यांच्याकडे ‘मोठी जबाबदारी’ सोपवण्याच्या शरद पवार यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच गुरुवारी कराड येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ‘मविआच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतचा विषय संपुष्टात येईल’ असे विधान केले. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता इस्लामपूरमध्ये झाली. त्या सभेत जयंत पाटील हे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. तोच धागा पकडून शरद पवार यांनी ‘‘पुन्हा एकदा सत्ता मिळाल्यास महाराष्ट्राची जबाबदारी इस्लामपूरच्या नेतृत्वाकडे सोपवणार’ असे विधान केले. तसेच याबाबत पक्ष आग्रही असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची उलटसुलट चर्चा सुरू असताना कराड येथे पवारांनी वेगळाच सूर आळवला. इस्लामपूरमधील वक्तव्याबाबत विचारले असता ‘आघाडीतील मुख्य घटक पक्षांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचा विषय संपुष्टात येईल’ असे पवार म्हणाले. मुख्यमंत्रिपदावर आपला दावा आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, की आधी निवडणुकीचा निकाल तर लागू द्या. मग त्या संदर्भात बोलू.

The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Baba Siddiqui murder, Baba Siddiqui NC,
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राष्ट्रवादीला धक्का
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी
sharad pawar loyalist jayant patil criticized amit shah narendra modi
मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे  घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

हेही वाचा >>>कौटुंबिक कलह टाळण्यासाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची माघार

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आपल्या पक्षाकडून जयंत पाटील चर्चा करत असून आतापर्यंत २०० जागांवर एकमत झाले असल्याचेही पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांनी ‘लाडकी बहीण योजने’वर टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले, की सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानेच त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ आणली आहे. अशा योजनांमुळे तिजोरी रिकामी करत मते मिळवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे.

शिराळा, वाळवा तालुक्यासह या भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी देशाची पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र घडविण्यासाठी यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील आदींनी प्रयत्न केले. आता याच परंपरेत उद्या राज्यात सत्ता आल्यानंतर जयंत पाटील हेच राज्याचे नेतृत्व करणार आहेत.– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)