छत्रपती संभाजीनगर : तिरंगी लढतीमध्ये हिंदू मताचे विभाजन व्हावे आणि दलित व मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण व्हावे, या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकारणात निर्णायक भूमिका घेऊ शकणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मुस्लिम मतदारांची गर्दी कमी दिसून आली. ‘युती धर्म पाळता येत नसेल तर युती करू नका,’ या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’ ला फटकारले. आता मत देताना चूक केली तर मुस्लिम सर्वसमावेश व्हायला तयार नाहीत, असा संदेश जाईल. शिवाय माणूस कितीही चूक असेल धर्म म्हणून आम्ही त्याच्याच पाठिशी उभे राहणार असा संदेश जात राहील. मुस्लिमांना सर्वसमावेशकता मंजूर नाही, हेही स्पष्ट होईल. त्यामुळे या वेळी मतदान करताना चूक करू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिमांना केले. शिवसेना, काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष नाहीत, हेही सांगायला ते विसरले नाहीत.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये ‘एमआयएम’ आणि बहुजन वंचित आघाडीची युती असल्यामुळे खासदार इम्तियाज जलील निवडून आले होते. गेल्या निवडणुकीतील युती तुटल्यानंतर त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले. ‘ युती’ चा धर्म पाळता येत नसेल तर युती करू नका असे त्यांनी सुनावले. मुस्लिम समाज मतदान करताना चूक करतो, असा त्यांच्या भाषणाचा सूर होता. ते म्हणाले, ‘ मुस्लिमांना अन्य समाज स्वीकारत नाहीत, असा उगीच समज होता. आता एका समाजाच्या आधारे निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्वसमावेश व्हावे लागते. पण तसे न करता व्यक्ती चुकीचा आहे पण आपल्याच धर्मातील आहे, अशी जर मुस्लिम कार्यकर्त्याची भूमिका असते. चूक ओवेसीची असेल किंवा अन्य कोणाची हे जर मुस्लिम कार्यकर्ते सांगू शकत नसतील तर ती भूमिका चूक ठरेल. मुस्लिम ती करत आहेत. पूर्वीही ‘ एमआयएम’ चा उमेदवार निवडून आला तो ‘ ओबीसी’ च्या मतांवर निवडून आला. पण त्यांनी नंतर वंचितच्या पाठित खंजीर खुपसला.’ आता पुन्हा एकदा मुस्लिम उमेदवार वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरवला आहे. पण आमखास मैदानातील गर्दीत वंचित बहुजन आघाडीचे पारंपरिक मतदारच अधिक दिसून येत होते.

Dhammachakra Pravartan Din, Deekshabhoomi Nagpur,
नागपुरात लोटला भीम सागर, निळ्या रंगाच्या सम्यक पताकांनी सजली दीक्षाभूमी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
Phule Ambedkari Wangmaykosha edited by Mahendra Bhavre released by Diamond Publications on September 30
एका साहित्य चळवळीचे अक्षरबद्ध लेणे
Prakash Ambedkar On Thackeray Group
Prakash Ambedkar : ठाकरे गटाला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील? प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, “फक्त…”
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : “अक्षय शिंदेला पोलीस कशाच्या शोधासाठी घेऊन जात होते?”, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

हेही वाचा…मराठा आंदोलकांच्या रोषाचा रावसाहेब दानवे यांनाही फटका

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वजाबाकीच्या तीन पदराची आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा पैठण मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात असल्याने त्यांच्या हक्काचे मतदान त्यांच्या बाजूने नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे भाजप- शिवसेना युती असताना चार वेळा निवडून आले होते. आता त्यांच्या पारड्यातून भाजपचे मतदान वजा आहे. एमआयएम बरोबर वंचित बहुजन आघाडी नसल्याने ‘ एमआयएम’ मधूनही मतांची वजाबाकी झालेली आहे. त्यामुळे आपल्या बाजूने जातीय मतपेढी ओढली जावी असे प्रयत्न करत असताना वंचितने पुन्हा एकदा ‘एमआयएम’ फटकारले आहे.

हेही वाचा…अमेठी, रायबरेली आणि वायनाडबाबतच्या निर्णयातून काँग्रेसला नेमके काय साधायचे आहे?

भाजप – ठाकरे गटात नव्या समीकरणाची नांदी

उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. संकटात त्यांच्या मदतीला धाऊन जाईन’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य पुढील राजकारणाची नांदी आहे. गेली पंधरा वर्षे जी मंडळी भाजपच्या मांडीला मांडी लाऊन बसली होती. ती अचानक एका रात्रीतून धर्मनिरपेक्ष कशी होतील. काँग्रेसही धर्मनिरपेक्ष नाही आणि शिवसेनाही असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी राजकीय पटलावर सर्व पक्षीय घराणेशाही असल्याचे आरोप केला. ते म्हणाले, सध्याच्या निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाचे बहुतांश उमेदवार प्रस्थापित मराठा आहेत. घराणेशाहीतील आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते जरांगे पाटील यांनी समोर आणलेले मराठेही नाहीत. त्यामुळे या सत्तेच्या राजकारणाला ओळखण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले. त्यांच्या टीकेचा जोर काँग्रेसवरही अधिक होता.