लक्ष्मण राऊत

जालना : राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला.राष्ट्रवादीशी युती करण्यास आमची का तयारी नाही हे योग्य वेळी सांगू, असेही त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Supriya Sule latest news in marathi
मतपत्रिकेद्वारेच निवडणूक घ्या; सुप्रिया सुळे यांची मागणी
Uday Samant claims that Thackeray faction MP Shiv Sena is in touch with Shinde faction
उदय सामंत ‘मिशन टायगर’वर ठाम, म्हणाले दहा ते पंधरा आमदार…
Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते जालना येथे आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रस्ताव दिला असला तरी शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने निवडणुकांसाठी आम्ही आमची तयारी करीत आहोत. युतीसाठी आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना आणि काँग्रेसकडे निरोप पाठविला असून आता काय करायचे,हा त्यांचा प्रश्न आहे.

हेही वाचा… भुमरे यांच्यामुळे औरंगाबादच्या वार्षिक आराखड्याच्या तरतुदीवर ग्रामीण पगडा

शिवसेनेत उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुणाचे पारडे जड आहे याचा निर्णय निवडणुकांच्या निकालातच लागेल. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकमेव कार्यक्रम देशाची घटना बदलण्याचा आहे. शिवसेना आणि आमच्यात मतभेद आहेत. परंतु ते घटना बदलावी, असे म्हणत नाहीत. काँग्रेस पक्ष घटनेचाच एक भाग असल्याचे आपण मानतो.

हेही वाचा… निवडणूक आयोगाच्या सुनावणीआधी बावनकुळे-शेलार यांची शहांशी चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला १०० दिवस झाले असून त्याबद्दल काय वाटते, असा प्रश्न विचारला असता आंबेडकर म्हणाले, अजून अशी जादूची कांडी निघाली नाही की ज्यामुळे शंभर दिवसांत बदल घडू शकेल. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुणाला धनुष्यबाण चिन्ह द्यायचे याचा निर्णय तत्काळ होईल असे वाटत नाही. या संदर्भात निर्णय घेणाऱ्यांच्या समोर सर्व तथ्ये आल्याशिवाय ते निर्णय घेणार नाहीत. अंधेरी येथील विधानसभेची पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी लढविणार किंवा नाही याचा निर्णय आमची राज्य समिती घेईल, असेही आंबेडकर म्हणाले.

Story img Loader