चंद्रपूर : चिमूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा सुरू आहे. कुणाच्या सभेला गर्दी अधिक होती, कुणाचे भाषण मुद्देसूद झाले, यावरून दोन्ही सभांमध्ये तुलना केली जात आहे. मोदींच्या सभेचा लाभ भाजप उमेदवार आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना होतो, की राहुल गांधींच्या सभेचा फायदा काँग्रेस उमेदवार डॉ. सतीश वारजुरकर यांना होतो, याबाबत विविध तर्क लावले जात आहे.

पंतप्रधान मोदी व राहुल गांधी यांच्या एकाच आठवड्यात झालेल्या दोन जाहीर सभांमुळे चिमूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. चिमूरमधून सलग दोन वेळा आमदार असलेले भाजपचे कीर्तीकुमार भांगडिया उमेदवार आहेत, तर काँग्रेसने डॉ. सतीश वारजुरकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. २०१९ मध्ये काँग्रेसमधील बंडखोरीमुळे भांगडिया अवघ्या ९ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. मात्र, यंदा डॉ. वारजुरकर यांनी कडवे आवाहन उभे केल्याने भांगडिया यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेचे नियोजन चिमूरमध्ये करण्यात आले होते. १२ नोव्हेंबर रोजी मोदींची सभा दुपारी एक वाजता झाली. या सभेत मोदींनी काँग्रेसवर थेट हल्ला करीत दलित, आदिवासी समाजात भांडणे लावत असल्याचा आरोप केला होता. तसेच राहुल गांधी आरक्षण संपविण्याची भाषा बोलत आहेत. त्यांना दलित, आदिवासींना आरक्षण द्यायचे नाही, अशी टीका केली. भाजप संविधान वाचविण्याचे काम करीत आहे. काँग्रेस राज्यातील तसेच देशातील विकासकामांना ब्रेक लावण्याचे काम करीत आहे. राज्यातील महाविकास आघाडीने भ्रष्टाचारात पीएच.डी. केली, असा थेट आरोपही मोदींनी केला. मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. मात्र मोदींचे भाषण सुरू होताच लोक सभामंडप सोडून जात होते. सुरक्षा व्यवस्था इतकी कडक होती की भाजपच्या उमेदवारांसोबतच मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांनाही मंचावर जाण्यापासून रोखण्यात आले. त्याचा नकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे.

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Congress MLAs praises of Haryana CM Saini
Congress : हरियाणा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? दोन आमदारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!

हेही वाचा – विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?

s

दुसरीकडे, राहुल गांधी यांची सभा डॉ. वारजुरकर यांच्या प्रचारार्थ झाली. या सभेलाही लोकांची प्रचंड गर्दी होती. या सभेत एकप्रकारे लोकांमध्ये जीवंतपणा व उत्साह दिसून येत होता. राहुल गांधी मंच सोडत नाही, तोपर्यंत लोक सभास्थळाहून हललेदेखील नाही. संघ व संविधान अशा दोन विचारधारा देशात आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी याचे विचार असलेल्या संविधानासोबत असल्याचे राहुल यांनी सभेत सांगितले. अदानी यांना धारावी प्रकल्प मिळावा, यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले. पक्ष फोडाफोडी केली, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.

जनगणना, दलित, आदिवासी व मागासवर्गीयांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांना संविधानविरोधी सांगत भाजपकडून मी संविधानविरोधी, आरक्षणविरोधी असल्याचा अपप्रचार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस पिकांना रास्त भाव देण्याची आमची तयारी आहे. महिलाना तीन हजार प्रतिमाह देण्यासोबतच आरोग्य विमा, बेरोजगारांना रोजगार, अशा विविध घोषणा त्यांनी केल्या.

हेही वाचा – धामणगावात भाजप, काँग्रेसमध्‍ये वर्चस्‍वाची लढाई

पंतप्रधान मोदी व राहुल गांधी हे भाजप व काँग्रेस पक्षांचे दोन्ही मोठे नेते येथे आल्याने सध्या चिमूरवासीयांकडून याच दोन सभांमध्ये तुलना केली जात आहे.

Story img Loader