अलिबाग- विधान परिषद निवडणूकीत झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे दुःख मलाही आहे. पण मी विधान परिषदेवर लवकरच पुन्हा निवडून येईन, असा विश्वास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पाटील यांनी अलिबाग शेतकरी भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार सुभाष पाटील, सुरेश खैरे, चित्रलेखा पाटील यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. विधान परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडी कडून दोनच उमेदवार देण्याचे ठरले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी तिसरा उमेदवार उभा केला. त्यामुळे आपली अडचण झाली. काँग्रेसनेही त्यांच्याकडे असलेली अधिकची मते दोन्ही उमेदवारांना विभागातून दिली असती, तर निकालाचे चित्र वेगळे असते.

हेही वाचा >>> हातकणंगल्यात शिंदे गटाला मदत करणारी अदृश्य शक्ती कोणती ?

MLA Hiraman Khoskar, Political journey Hiraman Khoskar, Hiraman Khoskar marathi news,
पवार ते पवार असा आमदार हिरामण खोसकर यांचा राजकीय प्रवास
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Ajit Pawar group leaders met Sharad Pawar at his residence in the wake of assembly elections print politics news
‘मोदीबागे’त भेटीगाठींना जोर; अजित पवारांचे शिलेदार शरद पवारांच्या भेटीला
Modi Bag in Pune, NCP Ajit Pawar group,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदीबागेत’ भेटी-गाठींना जोर
Supporters urge Ajit Pawar to contest from Baramati Assembly Constituency pune print news
अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याचा सर्मथकांचा आग्रह
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Raj Thackeray appeal, Raj Thackeray,
जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान
Eknath shinde influence on modi
विश्लेषण: मुख्यमंत्र्यांच्या प्रभावापुढे ठाण्यात भाजपची कोंडी? पंतप्रधान दौऱ्याचा काय सांगावा?

हितेंद्र ठाकूर यांनी शेवटच्या क्षणी त्यांनी मला मते दिली नाहीत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्याचवेळी विधान परिषद निवडणूकीत आमदारांची मते २५ कोटींना विकत घेतली गेली असा दावाही त्यांनी केला. या निवडणूकीत शरद पवार यांनी मनापासून सहकार्य केले. ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहीले त्यांनी केलेली मदत मी विसरू शकणार नाही. ज्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक असो अथवा इतर माध्यमातून करोडो रुपयांची मदत केली त्यांनी फसवल्याची खंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. झालेल्या चुका बाजूला ठेऊन आता पुढे जायचे आहे. नव्याने पक्षाची बांधणी करायची आहे. विधानसभेची तयारी करावी लागणार आहे. देशात छोट्या पक्षांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात चार आमदार असलेल्यांना महत्व वाढणार आहे, त्या दृष्टीने आपल्या पक्षाची तयारी असली पाहीजे. मित्र पक्षांची मदत होईल पण त्यांचा मदतीवर अवलबूंन न राहता निवडणूकीच्या तयारीला लागा, असा सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.