काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण झाली. २९ जानेवारीला श्रीनगरच्या लाल चौकात तिरंग फडकावत यात्रा पूर्ण झाल्याची घोषण करण्यात आली. यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी १३४ दिवस तामिळनाडू ते काश्मीर चालले. पण, केरळमधूनच राहुल गांधी यात्रा सोडण्याचा विचार करत होते, अशी माहिती राज्यसभा खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

राहुल गांधींच्या गुडघ्याचं दुखणं वाढलं होतं. त्यामुळे राहुल गांधी केरळमधून यात्रेतील प्रवास थांबवण्याचा विचार करत होते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनीही याबाबत माझ्याशी चर्चा केली होती. राहुल गांधींनी गुडघ्याचं दुखणं वाढल्याने यात्रेचं नेतृत्व एका वरिष्ठ नेतृत्वाकडे सोपवण्यात यावं, असं प्रियंका गांधींनी सांगितलं होतं, असं वेणुगोपाल म्हणाले.

loksatta readers feedback
लोकमानस : हकालपट्टी ही दबावतंत्राची नीती?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
cm Devendra fadnavis all people get spiritual satisfaction from Anandavan that is why anandavan is truly temple of humanity
आनंदवन हे मानवतेचे मंदिर,कृतज्ञता सोहळ्यात काय म्हणाले मुख्यमंत्री ?
राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”

हेही वाचा : नवे राज्यपाल कोण आहेत?

के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटलं की, “कन्याकुमारीतून यात्रा सुरु झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही केरळ राज्यात प्रवेश केला. तिथे पोहचल्यावर राहुल गांधींनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की, माझ्या गुडघ्याचा त्रास वाढला आहे. माझ्याजागी अन्य नेत्याच्या नेतृत्वात यात्रा पुढं नेण्यात यावी, अशी सूचना केली होती.”

“नंतर राहुल गांधींच्या गुडघेदुखीबद्दल माहिती देण्यासाठी प्रियंका गांधींनी फोन केला होता. यात्रेची धुरा अन्य वरिष्ठ नेत्याकडं सोपण्यात यावं, असं प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या. तेव्हा, देवाकडे राहुल गांधी बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती,” अशी माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

हेही वाचा : “मोदींसमोर केवळ राहुल गांधीच आहेत हे देशाने मान्य केलं आहे आणि केवळ काँग्रेस…” अशोक गहलोत यांचं विधान!

“शेवटी फिजिओथेरपिस्टकडून उपचार घेतल्यानंतर राहुल गांधींच्या गुडघ्याचं दुखण बरं झालं. आणि ते पुन्हा यात्रेत सामील झाले,” असेही के. सी. वेणुगोपालांनी सांगितलं आहे.

Story img Loader