हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग- ज्या मतदारसंघात कुठलीही लाट, प्रवाह चालत नाही असा मतदारसंघ म्हणून रायगडचा लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. अगदी १९८४ च्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत देशभर काँग्रेसला यश मिळाले असताना रायगडने विरोधात कौल दिला होता. कायमच हा मतदारसंघ प्रवाहाच्या विरोधात ठामपणे उभा राहिल्याचे चित्र आहे. हाच कल यंदाही कायम राहणार का, याची उत्सुकता आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?

लोकसभा निवडणुकीत १९८४, १९९६, १९९८, १९९९, २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत हा मतदारसंघ प्रवाहाच्या विरोधात होता. देशभरात काहीही वातावरण असले, तरी रायगड जिल्ह्यातील मतदार प्रवाहाच्या विरोधात ठाम पणे उभे राहतात. पूर्वीचा कुलाबा आणि आताचा रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांची बंडखोर वृत्ती या निमित्ताने कायमच समोर येत राहिली आहे. इंदीरा गांधी यांच्या निधनानंतर देशभरात काँग्रेससाठी सहानुभूतीची लाट पसरली. लोकसभा निवडणूकीत ५१४ पैकी ४०४ विक्रमी जागा काँग्रेसच्या निवडून आल्या. मात्र आताचा रायगड आणि त्यावेळीचा कुलाबा लोकसभा मतदारसंघाने शेकापच्या दि. बा. पाटील यांना निवडून दिले. काँग्रेसच्या ए. टी पाटील यांचा दारूण पराभव झाला. त्यांच्यावर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली. बॅरिस्टर ए. आर अंतुले यांनी या निवडणूकीत तराजू निषाणी घेत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांचाही पराभव झाला.

हेही वाचा >>> भाजपला ‘ ठाकरें ‘ ची राजकीय गरज?

१९९६ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकामध्ये देशात पहिल्यांदा भाजपचा प्रभाव दिसून आला. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजप समोर आला. मात्र या निवडणूकीत रायगड जिल्ह्यातील कुलाबा मतदारसंघातून काँग्रेसचे बॅरीस्टर ए आर अंतुले विजयी झाले. १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजप पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. पण या निवडणूकीतही रायगडने शेकापच्या रामशेठ ठाकूर निवडून दिले. भाजपला पाठींबा देणाऱ्या शिवसेनेचे अनंत तरे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. १९९९ मध्येही पुन्हा एकदा देशात भाजपचा प्रभाव दिसला. पण निवडणूकीतही रायगडमधून शेकापचे रामशेठ ठाकूर विजयी झाले.

हेही वाचा >>> अयोध्येत रामाचे, तर सीतामढीत सीतेचे मंदिर; जमीन अधिग्रहणाला बिहार सरकारची मंजुरी!

२०१४ मध्ये देशाभरात नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा प्रभाव दिसून आला. या निवडणूकीत रायगडमधून शिवसेनेच्या अनंत गिते विजयासाठी टोकाचा संघर्ष करावा लागला. अवघ्या दोन हजार मताधिक्याने ते निवडून आले. सुनील तटकरे नावाचे अन्य दोन उमेदवार निवडणूक रिंगणात नसते तर गीते यांचा पराभव निश्चित होता. २०१९ च्या निवडणूकीत देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा प्रभाव दिसून आला. देशात भाजपला भरभरून मतदान झाले. पण रायगड मधून भाजपच्या पाठींब्यावर उभ्या असलेल्या शिवसेनेच्या अनंत गिते यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावरून प्रवाहाच्या विरोधात मतदान करण्याची रायगडकरांची वृत्ती दिसून येते. म्हणून रायगडचा लोकसभा मतदारसंघ हा लाट, प्रवाहांविरोधात कल देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यावेळीही रायगडचे मतदार प्रवाहा विरोधात उभे राहण्याची पंरपरा कायम राखतात का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Story img Loader